स्वप्नात एकदा

स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं,
नशीबाच पुस्तक तुच कारं लिहायच ?
मी पान उलगडायचं,अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर .. पुस्तक तुच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसाय्रातुन एकटं नेऊन जाळायचं !!
देवाचं उत्तरं
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझ पान जोडायला?
तुझं नशीब तुझ तुच लिहयचं
आता तुच ठरवं,नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं.............

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा