आयुष्याच्या या वाटेवरती

आयुष्याच्या या वाटेवरती परीस्थितीचे
हे चढऊतार तर येतच राहतील.
सोलवटुन निघालेल्या मनावर मग..
घावाचे व्रण मात्र ऊमटतच् जातील्....

कुणी अश्रु गाळतील्
तर् कुणी निमुटपणे पितील.
कुणी खोटे हसु दाखवतील.
नाहीतर् कुणी बंड करुन ऊठतील....
पण
कितीही कुणी कहीही केले तरी
सावरणारी मन् पुन्हा पुन्हा तुटतील.

तुटणाऱ्या मनातुन् नवीन नवीन् कविता रचतील्....
त्यांना वाचुन् पुन्हा काही मनं सुखावतील्.
आपल्या मनातलं दुखं शब्दात पाहुन
पुन्हा एकदा ती गहीवरुन येतील.

आणि मग एके दिवशी....
सुर सुरांशी जुळुन येतील्
कोमेजलेली मनं पुन्हा एकदा फुलतील...
पावसाच्या सरी कोसळतील्..........
आणि मातीच्या सुंगधात मनामनात प्रेमाचे मोहोर बहरतील.

पण केव्हा हे वसंत ऋउतु येतील?
रखरखलेल्या जमीनीवर मायेचे पाघरुन घालतील.
कुणीतरी विचारा ऋतुराजाला की "केव्हा हे वसंत ऋउतु येतील..?"
निदान मनाला मनाच्या व्यथा तरी कळतील..

................सुषमा कस्तुरे

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा