काल अचानक एका धनदांडग्याने त्याच्या मित्राला फटकारले
" तुम्ही ! मध्यम वर्गीय लोक कधीच सुधारणार नाहीत
तुमची संकुचित मनोवृत्ती तुम्हाला कधीच
आयुष्यात स्वतःला पुढे येवू देणार नाहीत "
सखी ! मध्यम वर्गीय असणं शाप आहे का ?
मध्यम वर्गीय घरांत जन्म घेणं पाप आहे का ?
परिस्थितीशी लढणारी , थोडक्यांत सुख मानणारी
मध्यम वर्गीय आम्ही खरोखरच समाजाला ताप आहे का ?
जन्मतः हातात सोन्याचा चमचा घेवून येणारे फार थोडे आहेत
बाप जाद्यांच्या कमाईवर, वडिलोपार्जित धंद्यावर बसणारे महाभाग
आयुष्यात आरामात सर्व आईते मिळणारे हे फार मुजोर आहे
मध्यम वर्गीयांना टोमणे मारणे हे ह्यांचे काम आहे
महागाई, तुटपुंजा पगार , अमाप खर्च ह्यात
नेहमी आमच्यासारखा मध्यम वर्गीय होरपळतो
मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, स्वताचे घर घेण्याचे स्वप्नं पाहता(1BHK FLAT)
कर्जाच्या दलदलीत मध्यमवर्गीय नेहमीच फसतो
खरं सांगू ! मध्यमवर्गीयांचे खर्च, स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, गरजा
ह्या थोडक्यांत समाधान , सुख, शांती ह्यातच असतात
उगाच डोक्याला ताप घेवून tension मध्ये जगणे
ह्यांच्या तत्वाला अजिबात पटत नसतात
महिन्याला घर खर्चापुरता पगार, थोडीशी हौस मौस, स्वताचे घर (1bhk flat )
झाला म्हणजे आयुष्यात आपण सुखी असा समज असतो
कधीतरी महिन्याला हॉटेल मध्ये कुटुंबासमवेत जाऊन
कमीत कमी rate असलेला मेनूचा आस्वाद घेण्याचा बेत असतो
सखी ! एक तर सर्वांत श्रीमंत तरी व्हावे
नाही तर सर्वात गरीब तरी व्हावे
मध्यमवर्गीयांचे जगणं म्हणजे खरंच शापित आहे
" भिक नको पण कुत्रा आवर असेच जगणे आहे "
मध्यमवर्गीयांची दुःखे कुणालाच समजणार नाही
कुणापुढे हाथ पसरायचे ह्यांना कधीच आवडत नाही
काही नसले तरी आम्ही गुपचुपप पाणी पिवून उपाशी झोपू
पण मानाने जगू ! कोणाचे फुकट ऐकून घेणार नाही
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा