कोणी सांगेल का मला अस का होत ?
जिला जितका जिव लावावा ,
तिने तितकेच दूर जाव ....
जिला आपण आपल म्हनाव ,
तिने आपल्याला परक समजाव....
जिला आपण खरी मनापासून मैत्रिण मानावी,
तिनेच बॉयफ्रेंड सोबत आपली चेष्टा करावी......
जिच्या सोबत हसण्याचा प्रयत्न करावा ,
आणि तिनेच आपल्याला रडवाव ............
जिचे अस्तित्व आपण जपाव ,
तिला आपण असल्याच भानही नसाव ......
जिची आपण प्रत्येक क्षणी आठवण काढावी,
तीला साध आपल नावही लक्षात नसाव ........
जिला आपण आपल्या भावना सांगाव्यात ,
तिला त्यात मुलीच रस नसावा ........
जी स्वतः कुठेतरी चुकत असावी ,
तीने कधीही तिची चुकी न मानावी ........
ती स्वतः बदललेली असताना सुद्धा ,
' तू बदलला आहेस ' अस म्हणावी .........
एवढ होउन सुद्धा ,
मीच तिला खर मनापासून मैत्रिण मानावी ...........
अस का ???
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा