एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दुरावते..
ती व्यक्ती दुरावल्यावर तिची उणीव वेळो वेळी भासते..
त्या व्यक्तीची साथ आपल्यला लाभणार नाही याची जाणीव होते..
तेव्हा हे मन खायला उठते...
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
जेव्हा गैरसमजुतीमुळे एक चांगले नाते कायमचे तुटते...
जेव्हा असे होते तेव्हा दोघांचेही मन दुखावते..
एका क्षणात हे जग ठेंगणे वाटायला लागते..
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावर रागावते..
रागावणे हि तर प्रत्येकाची स्वाभाविक गोष्ट असते..
पण ह्या रागामुळेच कधी कधी होत्याचे नव्हते "होऊन जाते"
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
पण आपल्या जवळच्या व्यक्तीवरच रागवायचे असते..
कारण जवळच्या व्यक्तीच्या रागावण्यामागे प्रेमच दडलेले असते..
जसे दिसते तस नसते हे दोघांनाही उमजत असते..
पण गर्वाचे घर नेहमी खाली असते हे इथे दिसून येते..
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
जेव्हा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नाते तुटते..
एका पत्त्यामुळे सार होत्याचे करून टाकते..
कारण विश्वास तुटायला एक क्षण हि पुरून उरते..
पण विश्वास परत करून द्यायला आयुष्य कमी पडते..
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
हि वाट खूप दूर जाते..
पण काय सांगू मित्रांनो आयुष्य खूप छोटे असते..
एखादी व्यक्ती जीव लाऊन दुरावते..
तेव्हा हे छोटेसे आयुष्य मोठे असल्यासारखे भासते.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा