आजकालच्या ह्या मुली

 आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या
बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात
गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट
सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला
यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात
पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले
सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही
म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे
“ladies first ladies first”
Not in salawar
but only in mini skirt

तुम्ही पण कमाल करता यार!

तुम्ही पण कमाल करता यार!
प्रेमाच्या गोष्टी करता यार?
प्रेम on-line खुलते आजकाल
ह्रिदयामधे जपता यार?
scrap,sms हे प्रेमाचे बोल
डोळ्यांची भाशा बोलता यार?
प्रत्येक Forum वर एक मैत्रीण.
एकाच अबोली साठी झुरता यार
messages आणि chat सोडून
बाहेर भटकायच म्हणता यार?
Blogs वाचायचे मिळतिल ते
तुम्ही पुस्तके वचता यार?
Community मधे रमायचे आता
चौकात गप्पा मरता यार?
धावयचे सोडून जगासोबत
स्वप्नां मधे रमता यार?
ह्रिदयात जागा मागता यार?
अरे!कोणत्या जगात जगता यार?

टपरी

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही ‘टपरी’ म्हणायचो.
पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.
मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.
उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.
वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.

आमची कंपनी

आमच्या Software कंपनीची
बातच काही और आहे
येथे दिवसाचाही दिवस
आनी रात्रीचाही दिवस आहे
सकाळी सकाळी येथे
कामाचा श्रीगणेशा होतो
जरा उशीर झाल्यावर मात्र
मुंबईसारखा एक बोम्बस्फ़ोट होतो
बोनसचा वादा नेहमी येथे
क्षनात विसरला जातो
वाढदिवस सर्वांचा मात्र
आठवनीने साजरा होतो
दर दोन महिन्यांनी येथे
नव्या जागेच्या स्वप्नाची असते खिरापत
सोडुन कुनी गेल्यावर मात्र
होते Increment चे वाटप..
चहा Cofee च्या नावाने येथे
ज्युस झुरळाचा पाजला जातो
टी-मशिन स्वच्छ करनारा मात्र
वर्षातुन एकदाच बोलावला जातो
बाथरूम मध्ये झोपन्याची
येथे मजाच काही और आहे
बाथरूम कम मोबईल रूम
येथे नेहमीच एंगेज आहे
बाथरूम मध्ये जाण्यासाठी येथे
नशीब जोरावर असावं लागतं
दरवाजा Lock झाल्यावर मात्र
गाडीच्या चाबीनेच उघडावं लागतं
लंच नंतर येथे चहाचा
वेध सुरु होतो
चहावाला वेळेवर मात्र
रोज देवासारखा येतो
प्रत्येक जन येथला
रात्री उशीराच घरी जातो
बायको पोरं झोपल्यावर
एकटाच जेवन घेतो
बायका मुलांना यांचे
दर्शन कधी होत नाही
मुले विचारतात आईला
पप्पा नेहमी घरी कसे दिसत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन………………..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….

Miss Call

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||

'कोल्हापूर'ची शान

रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल ॥

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही ॥

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्‍न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते

प्रेम करायला अजुन जमलेच नाही

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही!!!!!!!!!
कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दिवस " व्हालेंटाइन डे " नंतरचा

दिवस " व्हालेंटाइन डे " नंतरचा
ती नाही म्हणाली म्हणून
त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला
पण त्याचा हा निर्णय
त्याच्या अंगावर चांगलाच बेतला
घरात कोणी नसताना त्याने
गळफास लावण्याचा प्रयत्न केला
मरण राहिल बाजूला
आणि तो फ्यान सकट खाली आला
आणि काय सांगू ?
घरातले यायच्या अगोदर त्याने
पटापट सगले आवरून घेतले
दुःख राहिले बाजूला कारण.....
मानेच्या दुखान्यनेच त्याला सावरून घेतले
दुखारया मानेला आता तो
पट्टा लावून बसतो
आणि कशी जिरली आपली
म्हणून गालातल्या गालात हसतो....

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

" इश्य..... " म्हणून मन खाली घालतच नाहीत.....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

" नवीन ड्रेस का ? " विचारले तर ह्यांना येतो संशय!!
" नाही रे, जुनाच आहे " म्हणून बदलतात विषय.
नकट्या नाकावर लटका राग दिसतंच नाही,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

मी घाऱ्या डोळांचे कौतिक करावे,
मग तिनेही गालात खुदकन हसावे...
कसलेच काय........ आज काळ गालांना
खळ्या त्या कशा पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

उद्या घोड्यावर बसून येईल एखादा उमदा तरुण,
" होशील का माझी राणी" विचारील हातात हात घेऊन....
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत,
" माझा नवरा मी केव्हाच शोधलाय " - त्या सांगतात ऐटीत...
घरून होकारासाठी थांबतच नाहीत......
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत......

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |
जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||
मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||
मी म्हणालो, काय रे बाबांनो... कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||
( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले...)
उगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||
सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||
बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||
आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!
आता तरी विचार करा, आणि माणसासारखा व्यवहार करा!

आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान
गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दॄष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुध्दा,तरीसुध्दा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं;
‘लव्ह’ हे त्याचचं दुसरं ‘नेम’ असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

सोळा वर्ष सरली की,
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना ?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुध्दा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं!
तुम्हांला हे कळलं होतं, मलासुध्दा कळलं होतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? “
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी ‘सेम’ नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

ति मी आणी बस........

वरळीला जाण्यासठी मि मुम्ब्ई सेन्ट्रलच्या बसमध्ये चढलो,
दुपारची वेळ, बस थोडीफार रिकामी, म्हणून खीडकीजवळ बसलो,

बस पुढे निघाली आणी प्रभादेवीजवळ थाम्बली,
त्या BUS-STOP वर एकच् गोड मुलगी अणी ति बस मध्ये चढली,

मी तीच्याकडे एकटक बघीतले, ति जवळ आली
EXCUSE ME! म्हणून माझ्याजवळ बसली,

शहारुन गेलो मि, बसताना झालेल्या तिच्या स्पर्शाने,
फ़िदा झालो तिच्यावर, तिच्या स्मित अश्या हर्षाने,

वाटले तिच्याशी बोलावे, म्हणून HI, HOW ARE YOU..?
असे मनातच पुटपूटलो,
पण तिच्याशी बोलण्याची हिम्मतच् झाली नाही म्हणून गुपचूपच बसलो,

बराच् वेळ मला तिचा सहवास लाभला, पण व्हायचे तेच झाले,
तिचे STOP आले, आणी तिला बस मधून उतरताना
पाहून मन मझे कासाविस झाले.

पण मीत्रानो मि हताश झालो नाही, पुढे जाण्यासठी बस रस्त्यावरुन वळ्ली,
आणी पुढच्या BUS-STOP वर पुन्हा एक गोड मुलगी चढली....

एकच चहा, तो पण कटीग.....

एकच चहा, तो पण कटीग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ति पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडुन?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रन्गवुन.....
एकच श्रिखन्दाचि वडी, ति पण अर्धि तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवि हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडुन?

एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन

बायको जेंव्हा बोलत असते

बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं

कोण म्हणतो

कोण म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत
मी म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात बरच काहि असत...

बिलगलेल्या तिच्या ओठांना शब्द आपण द्यायचे असतात
शोधायचि असतात ति स्वन्प जि तिच्या डोळ्यात कधिच नसतात
डगमगणार्‍या मनाला मग आपण सावरायच असत...

कोण म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत...

कधितरि मग तिची रत्यात गाठ पडते
साथिस तिच्या कोण्या एका देखण्या तरुणाची सोबत असते
हसुन मग आपण त्याला तिचा भाऊ म्हणायच असत

कोण म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत...

वेलंटाइन डे ला धिर करुन आपण फ़ुल घेउन जातो
पोटभरुन तिच्याकडुन मग यथेच्य शिव्या खातो
इतक सगळ होऊन सुद्धा तिला आपण दोषी धरायच नसत...

कोण म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत
मी म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात बरच काहि असत...

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

मुली

समजून सगळे नासमज
बनतात मुली
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली
अनोळखी पुरुषाला
दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना
काका का म्हणतात या मुली ,
बोलायला गेलो तर
लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
मुद्द्याच बोलण थोड़च असत
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,
जेव्हा खरच बोलण्याची गरज असते ....
तेव्हा नजर खाली करून रुमाल का
ख़राब करतात या मुली ?
पावसात भिजायच तर असत
तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??
वाचून ही कविता
चांगल्याच भडकतिल या मुली !!!!!
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...

Syllabus जरा जास्तच आहे

Syllabus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????

कँटीन मधला चहा

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !


पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधीउपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं............ .

बायको म्हणजे

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही ||
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-याला
तीच व्यवस्थित हाताळू शकते. ||

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते ||

आला गेला पै पाहुणा, सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते ||

मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा, तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते ||
सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते ||

सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते ||
वाहन मी चालवत असतो, शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत मला ती सांगत असते ||
म्हैस आली संभाळा, त्या बाईकडे काय बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे, सतत सुचना देत असते ||

घराच्या दारावर नेम्प्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते ||
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच असते,
फुटकं माझं नशिब, चांगली स्थळे सोडुन तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं, आजवर इथं टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते ..!!!

खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे , वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते..
साहेब काय, कारकुन काय, सगळ्यांची गत तीच असते ||
कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-यात खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे असं जगाला सांगुन
ती माझी अब्रू झाकीत असते..||

दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब सगळा ठेवीत असते ||
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी विकायला काढतो,
तेंव्हा शंभराची नोट हळुच ती माझ्या हातावर ठेवीत असते..||

वरवर राग असला तरी मनात तिच्या
रातराणीसारखी दडलेली एक प्रित असते
मी जेंव्हा कविता रचत असतो, तेंव्हा ती कविता जगत असते..||
कधी श्रावणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रछन्नपणे तळपत असते ||

तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय..
सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करीत असते ||
घरातील प्रत्यक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते
कारण अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिजत असते ||

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते || 

अशी आपली बायको असावी

अशी आपली बायको असावी - हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र , त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको - भक्कम पगाराची ,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

अशी आपली बायको - चतुर , शहाणी ,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र , मान तिची खाली असावी

अशी आपली बायको - सभेत धीट , कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र , ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको - प्रसन्न , सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र , तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको - शांत गंभीर , पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र , तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको - व्यवहारी , काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र , तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र , तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको - सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला
पण माझ्याकॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक... 

आता काय करायच?

आता काय करायच?
तिला भेटायला जायच
पण तिन नाही म्हणायच
तिन दुसय्रा बरोबर फिरयच
मग आपण कशाला मरायच
आता काय करायच?

तिने कॉलेजला जायच
पहिल्या बेंचवर बसायच
आपण शुक शुक करायच
पण तिन नाही बघायच
आता काय करायच?

तिला हॉटेलमध्ये न्यायच
तिच दिल जिकण्यासाठी
तिच बिल भरायच
तिन खोट thanks म्हणायच
आता काय करायच?

तिला लव्हर शिप मागायची
तिन मात्र राखी बांधायची
याला काय म्हणायच
नशीब बेकार म्हणायच
आता काय करायच?
आता दुसरीला शोधायच

आजची पोरं म्हणे प्रेम करतात

आजची पोरं म्हणे प्रेम करतात
एकीची आठवण काढत
दुसरीला भेटतात

सोबत फिरताना एकीच्या
विचार मनी नेहेमी वेळेचा
नाहीना येणार ती
वेळेआधी हिच्या जाण्याच्या

हातात हात घेवून एकीचा
स्पर्श अनुभवतात दुसरीचा
डोकं ठेवून एकीच्या खांद्यावर
स्वप्नात रमतात दुसरीच्या

हॉटेलात बसून order देतांना
विचारतात समोर बसलेलीला
मात्र मनात करत असतात
पाढा सोबत नसलेलीच्या

आवडी निवडींचा
अशाच द्वैतात असतात ती कायम
एक रुसली कि मग
दुसरीला बनवतात रागाचं कारण

अशेच चालू राहते त्यांचे
एकमेवाद्वितीय प्रेम
मग होते भान जेव्हा येते लग्नाची वेळ
हिला हो म्हणालो तर तिचं काय करू?
आणि तिला हो म्हणालो तर हिचं काय करू?

एकीच्या हाती देतात फुटाण्याच्या अक्षदा
आणि मग काय दुसरी कडून त्यांनाच मिळतात
फुटाण्याच्या अक्षदा.....

मग काय करणार
जातात शेवटी आई-बाबांपाशी
लाग्नलावून द्यात म्हणतात
तुमच्या आवडीच्या मुलीशी

मग बदलतात प्रेमाचे संदर्भ
बायकोच होते मग त्यांचे सर्वस्व ......

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं
वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं
म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो
चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?
टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला
नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला
आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण
दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण
मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं
विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं
एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?
Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?
शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी
प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी
लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली
हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली
प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते
कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,
ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते

"आय लव यु" बोलयचच राहतो

"आय लव यु" बोलयचच राहतो
रेसकोर्सवर धावताना घोडा
हळुच घोडीकडे बघतो
आज रेस जिंकलो तर
डिनरला नेईन म्हणतो...

बघा दिवसा ढ्वळ्या पक्षी
पक्षीणीला साद देतो
" वाट बघु नकोस गं , चिमणे "
कोकिळेकडेच जेवणार सांगतो...

बोकोबाही चालु आमचा
चोरुन दुध पितो
हळुच दुध पिता पिता
मनीलाही चोरुन नेतो...

भुंग्यांचही बरं त्यांना
बोलायलाच कुणी नसतो
कधी जाई-जुई वर , तर
कधी रातराणी वरही बसतो...

मोतीचीच गंमत बघा
रोज मजा करतो
आज "पपीबरोबर" तर
उद्या "पिंकीबरोबर" फ़िरतो...

कसला माणूस बुद्धीमान
साला सगळीकडेच हरतो
म्हातारा होत आला तरी
"आय लव यु" बोलयचच राहतो...

पोरी महागात पडतात

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात...

एकदा "BUS" मध्ये प्रवास करतांना

एकदा "BUS" मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली

उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती

तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला

मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली

आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE"च असते

प्रेमाला उपमा नाही

प्रेमाला उपमा नाही
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपला पैसे नाही,
पैश्याला नोकरी नाही,
नोकरीला डिग्री नाही,
डिग्रीला शिक्षण नाही,
शिक्षणाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन शिवाय प्रेम नाही,
म्हणुन प्रेमाला उपमा नाही ...

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु ही गोष्ट फ़क्त स्वतःशी बोलयची असते
लग्नाची असली तरी ती फ़क्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते

लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जाणुन बुजुन केलेला अविचार आहे

बोलणारे लोक खोटारडे असतात
स्वतःपासुन सुद्धा काहीतरी लपवतात
करतील काय सगळेच बाजीराव नसतात

लोक नेहेमी असेच वागतात
बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर चिखल उडवतात
येता जाता नैतिकतेचे डोस पाजतात

बालपणी मस्तानी एक परी असते
तारुणा‌ईच पहिल प्रेम असते
वय वाढल्यावर सखी असाते
काहीही म्हणा प्रत्येकाच्या मनात असते

प्रत्येकाला ठा‌उक असते मस्तानी आपली होणार नाही
सगळ्यांचे नशिब काही तेवढे थोर नाही
तरीही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते

पाचवी पर्यंत

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की
प्रेम म्हणजे काय असतं,
पण बारावी म्हणजेआयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत,
पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला,
नाही म्हणाली तर कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर
बरं झाल असत ना!... पण ते कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना..
जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही

आयुष्यात फारच गडबड झाली आहे

आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे

आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होती
दाढी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाईफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती

सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
मोलिव्ह शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त झाला आहे
लाईफ मध्ये कसा एकदम एंथू आला आहे

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

दिसली पोरगी, मार शिट्टि भेटला चम्या,
उडव खिल्ली वेळ मिळाला तर कर भंकसगिरी
एकूण काय तर, आदर्श अशी जीवन पद्धती होती

पोरगी दिसल्यावर आता शिट्टी वाजत नाही
चम्या लोकांची खिल्ली, हल्ली आपण उडवत नाही
भंकसगिरी तर पुर्ण विसरलो एकूण काय तर,
आपण आता जेंटलमन झालो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

पिक्चर पहायचा? ''नील'' कमल पाहू
भुक लागली आहे? वडा पाव मारु
शर्ट कोणता घालायचा? लाल भडक एकदम फंडू
हेयर स्टाईल कशी करायची? छोड यार टक्कलच करु
आता मात्र रोज ''RHTDM'' ची पारायणे करतो आहे
काटा चमचा वापरून पीज्झा खायला शिकतो आहे

इस्त्रि केलेला फॉर्मल शर्ट, पॅंटमध्ये व्यवस्थीत इन करतो
तेल लाऊन केसाला, कोंबडा काढुन भांग पाडतो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

नशीब खुलले, भाग्य फळफळले, ग्रॅंड लॉटरी लागली
तिच्या कडून कॉफी प्यायची मला चक्क ऑफर आली
वाटले कष्ट आपले सार्थकी लागले
''खयालो की राणी'', ''बहारो की मलीका'' चे हृदय आपण जिंकले

भेटताच कँटीनमध्ये तिने मस्त क्लोज अप स्माईल दिले
दोन कॉफी ऑर्डर करुन.. मग माझ्याकडे पाहिले
''तुला काही सांगायचे आहे'', ती बोलली लाजत
'' मला तर सगळं आधिच कळले'' मी म्हणालो हसत

ईश्श... अशक्यपणे बोलली
ती गालावर खळी पाडून मला तर वाटले
माझे शुभमंगलच गेले आटपुन
''तुझा दादा मला आवडतो हे तुला कसे कळले?''
एकून हे कानच काय, माझे हृदय सुद्धा फाटले

साध्या सरळ आयुष्यातली गडबड आता संपली आहे
इथून दूर कलकत्याला- दादा वहिनी मजेत आहेत.

तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पीझ्झा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सीगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो

तो मुलगा मराठी असतो...

ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...

ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'
असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो

ती मुलगी मराठी असते

class मधे अनेक good मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
class मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
class मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
class मध्ये अनेक मुली असतातपण
वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवतेती
मुलगी मराठी असते
class अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते....

दिसतं तस नसतं, म्हनुनच जग फ़सतं

 स्वत: सदैव रडवून दुसरय़ाला नेहमी हसवायचं असतं
आपल्या ईच्छा मनात ठेवून दुसरय़ाचं कौतुक करायचं असतं
मनातले चेहरय़ावर कधी आनायचं नसतं
कारण असे करुनच दुसरयाचे मन फुलवायचं असतं
दुसरयासाठी राब राब राबयचं असतं
आनी स्वत:च्या जीवाचे मात्र राण करायचं असतं
एवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतं
कारन सर्वानाच आपापले स्वार्थ साधायचं असतं
आपल्य ईच्छेचा खुन करायला कुनीही तयार असतं
आनी आपलं मन मात्र दुसरय़ासाठी सदैव तयार असतं
पन दुसरय़ाचं भलं करुनही नेहमी आपलचं चुकीचं दिसतं
आनी दुसरय़ाचं मन आपल्याला पाहुन खुदकनं हसतं
पन एकांतात आपलं मन किती रडत असतं
कारन एकांत नसतांना ते सर्वासाठीच हसतं
आनी म्हनुनच हे सर्व जनसमुहाला माहीत असतं
की दिसतं तस नसतं, म्हनुनच जग फ़सतं

कधी कधी

वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं…….

वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं दे‌ऊन
आपण मात्र रीतं व्हावं……….

वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं……..

वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं………

वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं………

आठवणींच पिंपळपान

गाव माझा जुना माझी वाट पाहात आहे
दुरवरच्या शहराचा तो थाट पहात आहे ।
दुरदुर हिरवी पहाटे डोलणारी धरती
झुंजूमुंजू झाले की देवळामधली आरती ।
देवाची ती पुजा तो दरवळणारा धुप
अजुन जाणवतेय मला लाल दुलाईची उब ।
नदी काठचं घर,समोर टाकलेले सडे
उगाच आठवताय मला नदित फेकलेले खडे ।
घरामागचे अंगण,अंगणातले खेळ दिसताय अजुन
माझ्या सवे खेळणारी ताई चाललीय पहा सजुन ।
वेशीवरचं झाड,त्या झाडाची ती सावली
त्या झाडाखालचे देऊळ , ती लोभस गुरुमाउली ।
अजुन बोलावतोय मला ,सुरपारंब्याचा तो खेळ
अजुन भुलवतोय मला ,फुलभुंग्याचा तो मेळ ।
शाळेसाठीची दिसतेय अजुन कच्ची पाउलवाट
वाटेवरली चिंच,शेजारुन वाहणारा तो पाट ।
शाळेची पडकी अजुन तशीच उभी आहे
खिडकीतुन दिसणारया टेकडीची अजुन सुन्दर खुबी आहे ।
पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।
पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।
साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।
थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।
गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी……
…………………………आठवणींच पिंपळपान ।

आता माझ standard वाढु लागलय…

एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald’s चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
“वन रूम kitchen”मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं…
म्हनुणच ….
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय….
कारण …..
आता माझ standard वाढु लागलय…

आले सगळे बघायला

होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,


आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥
जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥
काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥
कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥

मी मुंबईकर....

भरून येतात डोळे, दाटून येतो कंठ
पण शब्दांना आता, आवाज नाही माझ्या

आयुष्याची कमाई, चारशे स्क्वेअर फुट फक्त्
सुखांना यायला घरात, जागा नाही माझ्या

त्यांच्या अपेक्षा मोठ्या, तिच्या मागण्या छोट्या
माझ्याच स्वप्नांना इथे, जगात वाव नाही माझ्या

चार आण्याची नोकरी, आठ आण्याची जिंदगी
आयुष्यात रुपया कधी, आलाच नाही माझ्या

दोन वित पोटासाठी, विकली जिंदगी मी
उधार जगण्याला आता, अंत नाही माझ्या

सुन्न घामेजलेली गर्दी, अन कोमेजलेली मनं
बधीर पळणार्‍या पायांना, ठाव नाही माझ्या

त्यांचा झाला रास्तारोको, यांनी थांबवली रेल्वे
दोन दिवस् घरात चुल, पेटली नाही माझ्या

शिवाजी पार्कवर गर्दी, बोलणारे नेतेही दर्दी,
पण त्या मेंढरांना व्यथांची, जाण नाही माझ्या

लावला लिलाव वेड्यांनी, मजबूर लाचारीचा माझ्या
मग कळाले अस्तित्वाचा, काहीच भाव नाही माझ्या

घातल्या गोळ्या मुर्खांनी, मिटवायला नाव माझे
रक्ताच्या थेंबाला तसाही, कुठेच गाव नाही माझ्या

कधी फुटला बाँब, केव्हा जळाला डबा
प्रेताला अजून इथे, नाव नाही माझ्या

कशी झाली चौकशी, कोणी दिला दाखला
मरणाला कसा कुठलाच, पुरावा नाही माझ्या

कधी झालो मुंबईकर, कधी मिटली ओळख
मरून देखील प्रश्नाला, उत्तर नाही माझ्या

कोणी दिला राजीनामा, कोणी मिळवली पद्के
पण कोणलाही मरणाची, खंत नाही माझ्या

कोणी काढली रॅली, दिल्या चॅनेल्सना बाईटस
दाखवला कळवळा त्याचा, मरणाशी संबंध नाही माझ्या

कुठे गेली मदत, कुठे सहानुभुती त्यांची
पोरक्या घराला कोणीच, वाली नाही माझ्या

बांधली स्मारके त्यांची, ज्यांची मोठी नावे
सामान्यतेचा एकही, कुठेच चिरा नाही माझ्या

बेगडी त्यांची तत्वं, खोट्या त्यांच्या आशा
एक मत सोडून कशालाच, अर्थ नाही माझ्या

गुमान जगणं इथे, मरणं देखील बेनाम
जिवंतपणी कधी लक्षात, आलंच नाही माझ्या

किमंतु
आनंदऋतू प्रकाशन

एकदा आम्ही ठरवलं!!

एकदा आम्ही ठरवलं!!
एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं
मी रुसायचं गाल फ़ुगवुन
आणि तिने समजवायचं
ती गुदगुल्या करणार
मी खुदकन हसायचं
हसता हसता पाणि येइल डोळ्यात
तिने ओठांनी टिपायचं
मी मात्र तेव्हा लाजुन
तिलाच घट्ट बिलगायचं
मी हात फ़िरवायचा
तिच्या लांबसडक केसांतुन
गाणं सुद्धा गुणगुणायचं
तिने शांत पडुन रहायचं
कुशीत शिरेल तीच अचानक
मग तिनेच वादळ व्हायचं
मी मात्र तेव्हा
तिला अर्पण व्हायचं
बेभान होवुन मीही देहात
तिचं वादळ भिनवायचं
वादळ शमल्यावर दमलेल्या तिला
मी अलगद थोपटुन झोपवायचं
एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय.....?

शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय.....?
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"

तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"
ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"

"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।

"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास...
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

आयुष्य म्हणजे कटकट..

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं

सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत

पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

माणसा

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो..
आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली ,
पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?

जीवन असच जगायच असत.

जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.
अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.
फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.
भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुन
भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत.

कोणी गेलं म्हणुन आपण

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,

आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,

कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

कोणी गेलं म्हणुन........

तिने विचारले मला

तिने विचारले मला कविता कशी सुचते ?
कल्पनाच आसते ती की सत्य शब्दात गुंफते ?
मी म्हटले माहित नाही कशी ती बनते
तूच सांग मला बिज्याला हिरवे रूप कसे मिळते ?
ती म्हणाली सोप्पे आहे बिज पुरावे लागते.
ख़त पानी घालून ते रुजवावे लागते .
काल जाता काही चमत्कार तो घडतो.
बिज्याला तेव्हा हिरवा मोक्ष्य मिळतो.
मी म्हटले कवितेचे आगदी तसेच असते .
आजूबाजू ला आपल्या जे काही घडते .
कळत नकळत ते ह्रुदयात जावुन बसते .
आच्यानक मग त्याला शब्दरूप मिळते .
कळत नकळत एक काव्य बनते .
दुःख जेव्हा हृदयाला प्रमाणा बाहेर छळते.
आप्रधाचे ओझे जेव्हा मनाला सलते .
आसत आपल कोणी जे बरोबर नसते.
तेव्हा शब्द जुळतात कविता बनते .
कोणाच्या भेटीने जेव्हा आपण फुलतो.
स्वताच्याच कल्पनेत आसमंतात उडतो.
स्वप्नाच्या झुल्यात मनसोक्त झुलतो .
तेव्हा लय लागते आणि कविता जन्मते....

का? अचानक.......

का? अचानक.......
असे हे दिवस बदलतात,
क्षणात होत्याचे नव्हते करतात,
दुखाना अचानक सुखात बदलतात,
सुखाना अचानक दुखात बदलतात,

का? अचानक.........

मला थोड़े यश मिळताच,
माझ्या यशावर जलू लागतात,
माझ्या प्रगतिच्या वाटेवर,
का असे काटे पसरवितात,

का? अचानक............
जर माझी जबाबदारी वाढतेय,
तर यांचे काय कमी होतेय,
जरी मला वरुन मान मिळतोय,
तरी यांना मी तरी कुठे कमी देतोय,

का? अचानक............
कालपर्यंत माझ्या मदतीला येणारे,
आज हाकेला दुर्लक्ष करतात,
काय माझा दोष आहे,
ज्याची मला शिक्षा देतात,

का? अचानक............

अशी मानसे बदलतात,
माझ्या चंगुलपनाचा फायदा घेतात,
मी चांगले बोलतोय,
मग ते का वाकडयात शिरतात,

का? अचानक............
कालपर्यंत वरुन चांगले भासनारे,
आज का मागुन सुरे खुपसतात,
मी तोंडावरच चांगले वाईट बोलतो
मग ते का मागुन वार करतात

का? अचानक...........................

आपल्या जवळ जे नाही

आपल्या जवळ जे नाही
त्याचीच मानवी मनाला ओढ असते
सर्वच मनं सारखी घडत नसतात
म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते .........

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

मला कधी कळलच नाही

मला कधी कळलच नाही

नियम माणसांसाठी
कि माणुस नियमांसाठी???
मला कधी कळलच नाही

आपण देवाला दगड मानतो
कि दगडाला देव मानतो???
मला कधी कळलच नाही

हसता-हसता रडायचं
कि रडता-रडता हसायचं???
मला कधी कळलच नाही

प्रेमात 'स्व'ला जपायचं
कि 'स्व'ला जपण्यासाठी प्रेम करायचं???
मला कधी कळलच नाही

वाहत्या या वाऱ्याला,,,,

वाहत्या या वाऱ्याला,,,,
कधीच थांबवायचं नसतं....
मनातील दुखांना मात्र,,,
नेहमीच आवरायचं असतं....

समुद्राच्या लाटांना,,,,
कधीच अडवायचं नसतं....
नयनांच्या आसवांना मात्र,,,
पापण्यातच थांबवायचं असतं.....

फुलाच्या गंधाला कधीच,,,
दरवळल्यावाचून ठेवायचं नसतं.....
तुझ्या आठवणींच्या गंधाला मात्र,,,
मनातच जखडायच असतं......

इंद्र-धनुच्या रंगांना,,,,
इकडे-तिकडे पसरवायच नसतं....
आयुष्यातील प्रत्येक रंग,,,,
जरी बिखरलेलं असतं..........

पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांना,,,
गप्प करायचं नसतं.....
मनातील इच्छांना मात्र,,,
ऐकून सोडायचं असतं.....

पंखांच्या भरारीला,,,,
कधीच कापायचं नसतं....
आपल्या मिलनाच्या स्वप्नाला मात्र,,,,
डोळ्यातच दाबायचं असतं....

का वेडं मन असं,,,,
इच्छा बाळगत असतं......
तू येणार नाहीस हे जसं,,,,,
त्याला ठाऊकच नसतं..............

गरीब माणुस

गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते!

कुनाचं बरोबर कुनाचं चुक

कुनाचं बरोबर कुनाचं चुक
सर्वांना इथे प्रेमाचीच भुक
प्रेमाच्या अडीच शब्दामधुन
उभ्या जन्माचं नातं जुळत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

दु:खाशी नातं येथे जन्मताच जुळते
सु:खाची भेट मात्र क्वचितच घडते
तरिही क्वचितच्या या भेटीसाठी
मनं सतत झुरत बसतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

अपयशाचे कडु घाव मनं कित्येकदा झेलत असतं
आयुष्यातल्या खाचा-खळग्यात पडुन ते ठेचत असतं
तारि आशेच्या मागे वेडं मनं सतत धावत फ़िरतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

व्यवहारी या दुणियेत मानसं
मानुसकी विसरुन जगतात
मुखवट्यांच्या गर्दिमधे
भावनांचा लिलाव मांडतात
तरि मायेच्या कनभर ओलाव्यासाठी काळिज तडपत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

जुन्या वहीची पानं चाळताना

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

एका सागराची कथा

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख

इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख
प्रत्येकाची एक वेगळी कहाणी ...
दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार ?
प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी !
खूप भेटतात मित्र, सगे, सोयरे..
पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके..
कधी कधी तर आपले जवळचेच
वाटू लागतात जणू परके !
अशा वेळी कोणी अनोळखीच
जास्त जवळचा वाटू लागतो...
आपल्या मनातल्या जखमांवर
जो हळूवार फुंकर घालतो !
वरवर बोलणारे अनेकजण भेटतात..
पण असा एखादाच असतो ...
जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो !
तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा
जो बघू शकतो

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे
मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन
मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत......

आपण सुपर पॉवर

आपण सुपर पॉवर
आसेच बसलो होतो परवा पेपर वाचत
तेवढ्यात पींट्य़ा आला नाचत नाचत
मोठ्याने म्हटला बाबा "आता आपण सुपर पॉवर होणार ?"
समृद्ध होणार देश दुःख सगळी जाणार .
आता फार थोडा कालावधि राहिलाय
त्यानी २०२१ चा मुहूर्त पाहिलाय
मनात हसलो आणि म्हटले
खरच कसा काय याने स्वताच सम्बन्ध लावलाय
सुख आणि सुपर पॉवर काय मेंळ साधलाय
आरे २०२१ यायला खुप वर्ष जातील
पण रोज आत्महत्या करणारे शेतकरी तोवर राहतील
भाषण बजी करुन लालूच दाखविने धंदा यांचा छान आहे
मजबूर सामान्य माणुस, आतिरेक्यांच्या हाथी जान आहे .
यांच्यासाठी ज़ेड सिकुरीती आणि बुलेट प्रूफ़ वाहान आहे .
सामान्य माणुस लाचार मंदित नोकरी गेली,घर ही गहाण आहे .
आता स्वप्नेच पुरेशी आहेत त्याला थोपवायला .
फसतात तुमच्या सारखी पोर मिळतात इलेक्शन साठी वापरायला

डोळ्यातील अश्रू पडतात

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

वादळ आता माणसाळतंय!

उधळत, उसळत,-- थैमान घालणारं,
वादळ आता माणसाळतंय......

उजाड झाले आहेत किनारे
आणि निर्मनुष्य झाल्या आहेत वस्त्या
पाऊलवाटा शोधताना
स्वतः मधेच हरवलंय
पण तरीही ..........
वादळ आता माणसाळतंय !

एकाकी वृक्षावर
विस्कटलेलं घरटं सावरण्यासाठी
-----काडी काडी शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!

उगारलेले हात जोडण्यासाठी
दुरावलेली मनं सांधण्यासाठी
आकांतानं तळमळतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!

राख पसरली आहे आकांक्षांची
आणि उरले आहेत
काही कोळसे ....... माणुसकीचे
उजाडलेल्या जमिनीवर, हिरवी पात शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!

उरल्या नाहीत कसल्या खुणा
अन दीपस्तंभही कोसळलेले
स्मशानवाटेवर... जीवन शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!
संघर्ष आहे शाश्वताचा-- अतर्क्याशी
आणि मानवतेचा ---- क्रौर्याशी
सत्यासाठी लढताना थकलंय
तरीही ..........
वादळ आता माणसाळतंय!

कळत नाही या वाटेवर

कळत नाही या वाटेवर
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?

मन आपले किती भाबडे असते

मन आपले किती भाबडे असते
नको त्या गोष्टींचा ध्यास धरते
स्वतःच्याच विचारांत गुरफटत जाते
मन आपले किती भाबडे अस्ते.........

नियति ही सुद्धा एक गोष्ट असते
हे मानण्यास तयारच नसते
प्रेमात खोल खोल बुडत जाते
मन आपले किती भाबडे अस्ते.........

मृगाजला मागे जिव तोडून धावते
हाती काहीच लागत नस्ते
तेव्हा कसे वेडेपिसे होते
मन आपले किती भाबडे अस्ते.........

घात होतो जिथे तिथेच रेंगाळत रहाते
नजाणे कोणती आस त्याला नेमकी असते
स्वतःच स्वतःवर चिडत रहाते
मन आपले किती भाबडे अस्ते.........

जीवन हे नेहेमी प्रवाही अस्ते
ते कधीच कुणासाठी थाम्बत नस्ते
शाश्वत सत्त्याची ह्या त्यास जाणीवही असते
मन आपले किती भाबडे असते .........

समोर आहे त्याच्या नावाने

समोर आहे त्याच्या नावाने, उगीचच कह्‌णतात लोक
कधिच दिसत नाही त्याला मात्र, "देव" म्हणतात लोक

जो तो आपल्या साठी आपले आयुष्य जगत असतो
मग प्रेम, त्याग वगैरे शब्द कुठून आणतात लोक?

नातं जर असेल नाजूक धागा, तर थोडं सैल सोडायला हवं
सगळं कळूनही तुटेपर्यंत, का बरं ताणतात लोक?

माहित नसते कशासाठी, आहे हा सर्व खटाटोप
मृगजळाच्या मागे धावून तरी पण शिणतात लोक

जो मेला त्याच्यासाठी "अमर रहे" च्या घोषणा देतात
आणि जो जिवंत आहे त्याची, कबर खणतात लोक

आशिष

दुकानात डायरी पाहिली की

दुकानात डायरी पाहिली की
तिला विकत घ्यावंसं वाटतं
रोजच्या आठवणींचे गुंते
कागदावर सोडवावंसं वाटतं

तोच दिवस, तशीच रात्र
जिवनात काय आहे तरी नवं
सगळंच पोकळ वाटतं
मला काही वाटत नाही हवं

क्षण, शिक्षण बनायला
ते डोक्यात उरावे लागतात
प्रसंग, आठवणी बनायला
ते कुठेतरी मुरावे लागतात

दर क्षणाला कैद करणारा
माझा हा अट्टाहास कसला
क्षणाला, क्षणासारखं जगतो मी
माझं जीवन, रुका हुआ फैसला

चांगले प्रसंग कधीच आठवत नाहीत
मी फक्त वाईट प्रसंगांना आठवतो
म्हणून भुतकाळात जगणाऱ्यांसाठी
मी डायरी दुकानातच ठेवतो...

बोलताना जरा सांभाळून....

बोलताना जरा सांभाळून....
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते
फ़रक फ़क्त एवढाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापले जाते

जरी तलवारीच्या जखमेतून रक्त
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू
येत असले तरी,
दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखी असते.

म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........

शब्दच मानसाला जोडतात
शाब्दच मानसाला तोडतात
शब्दच रामायण आणि महाभारत घडवतात........

तुझ्या एका शब्दावर
माझे सर्वस्व अवलंबून आहे
तुझ्या एका शब्दावर माझे हसने
आणि एका शब्दावर रडणे आहे

म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते

एक कळी

एक कळी उमलायची राहिली
गालावरची खळी तशीच राहिली
तीने ऐकले उमलले की
पाकळ्या पाकळ्या होतात
हे अर्ध आयुष्य पण
कस काय जगतात
ह्या विचारात ती राहिली
वार्याने हसवून बघितले
दवाने भिजवून टाकिले
तरी ती काही उमलेना
भुग्याने कानात सांगितले
हा नियमच आहे निसर्गाचा
निसर्गात स्वताला रंगवन्याचा
कळीचे फुल झाले सुगध
चारही दिशा दरवलू लागला
येउन फुलपाखरू मकरंद चोरु लागला
काही क्षण सहवासाचे
तो देऊन गेला
शेवटी परकाच ना आपला
या आकाशी उडू लागला .....

दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,
ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.
इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,
दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.

पातेल्याची गर्मी वाढू लागली,
तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.
हे पाहून दूध दु:खी झाला,
त्याने पाण्याला अटकाव केला.

सायीचा थर त्याने दिला ठेवून,
पाणी बिचारं त्यात बसलं अडकून.
इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,
सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.

शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,
"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. "
पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,
"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. "

पाण्याने दुधाला खुप समजावलं,
पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.
शेवटी दोघांनी एक निश्चय केला,
आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;
त्यालाच त्यांनी नष्ट केला.

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं.........

आत्ताच कुठे हसण शिकलोय मी

आत्ताच कुठे हसण शिकलोय मी
रडण्याची भिस्तच मुळी उरली नाही...
झेलतोय परिस्तिथिचे घाव जिव्हारी
वेदनांची संवेदनाच भूललोय मी...

प्रकाशमान व्हायचंय मज
तेजपुंज त्या मित्रासम...
अन कवेत घेवूनी सारे विश्व
हरवायचय त्या सिकंदरास...

जन्मलो म्हणून जगणार नाही
अन असाच राखेत विरणार नाही...
ठसे सोडूनी जाईन जीवन काठावरती
आल्या लाटा कितीही , मिटणार नाही ...

--संदेश

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेयापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हत घ्यावे

-विंदा करंदीकर

जिप्सी

जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवते बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौल पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतों रंगत मी किती
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर ... स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा ...
खळखळणारी पानें ... दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ ... अंधुक ... पुसट
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप ...
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून ...
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
मंगेश पाडगांवकर

स्वप्नात एकदा

स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं,
नशीबाच पुस्तक तुच कारं लिहायच ?
मी पान उलगडायचं,अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर .. पुस्तक तुच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसाय्रातुन एकटं नेऊन जाळायचं !!
देवाचं उत्तरं
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझ पान जोडायला?
तुझं नशीब तुझ तुच लिहयचं
आता तुच ठरवं,नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं.............

आपल्या आयुष्याचा

आपल्या आयुष्याचा खुप मोठा भाग व्यापून उरतात स्पर्श..
जन्माला आल्या पासून...मरे पर्यंत साथ करणारे स्पर्श..
काही स्पर्श हवेहवेसे वाटतात..काही अगदी नकोसे झालेले असतात...
काही सोन्यासारखे अगदी मनाच्या कुपित लपवून ठेवावेसे वाटतात..
काही झाडून झटकून टाकवेसे वाटतात..
तस् खर पहाता मानस आपल्याला सोबत करताच नाहीत...
आपल्याला सोबत करतात त्यांचे स्पर्शच...
न बोलता खुप काही बोलून जाणारे स्पर्श..
न मागता साथ देणारे स्पर्श..
कुशीत घेउन सांत्वन करणारे स्पर्श..
मिठीत येउन विसावणारे स्पर्श..

काय सांगु माझ्या बद्दल

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

जीवनात नाती

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

बाळु सकाळी न चुकता

बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार
संध्याकाळी कसा बसा ६.५२ला लोंबकळणार
चुकुन विंडोसीट मिळताच बाळु धन्य होणार
तो बिचारा मध्यमवर्गीय तो असाच रहाणार

कधी सरकार कोसळणार
कधी शेअर बाजार वधारणार
बाळु मात्र निर्विकार रहाणार
सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

माणुस हा मरणारच, कधी बाळुचंही कोणी मरणार
पराकाष्ठेने बाळु डोळ्यातुन दोन थेंब सांडणार
पोचवुन आल्यावर बादलीभर पाण्यात अंघोळ करणार
दुस-या दिवशी सकाळी ८.२१ पकडणार

श्रावणात घन निळा बरसणार
आजुबाजुला मोगराही फ़ुलणार
पिसारा फ़ुलवुन मोरही नाचणार
बाळु मात्र न चुकता ८.२१ पकडणार

दिवसभर ऑफ़िसात बाळु पाटया टाकणार
साहेबाच्या शिव्यादेखील मख्खपणे ऐकणार
घरातल्या कटकटींतही बाळु तटस्थ राहणार
सकाळी मात्र न चुकता ८.२१ पकडणार

कधीतरी बाळु म्हातारा होणार
निवृत हौउन निवांत आयुष्य जगणार
८.२१ च्या वेळेला थोडा अस्वस्थ होणार
८.२१ मात्र न चुकता बाळुशिवाय धावणार

“कणा “

‘ओळखलत क सर माला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा

– कुसुमाग्रज

दोन चिमण्या भेदरलेल्या

दोन चिमण्या भेदरलेल्या
वादळ वाऱ्याला घाबरलेल्या
थरथरणारं काळीज घेऊन
वळचणीला बसलेल्या
चिमणी म्हणाली चिमण्याला
कशी तोंड देऊ या तुफानाला
वाटते मज भीती आता
होणार काहीतरी जिवाला
चिमणा म्हणाला चिमणीला
भिऊ नको घाबरू नको
मी आहे ना
तुझ्या संगतीला सोबतीला
पुन्हा पंखांत बळ येईल
दुबळं का होईना
थोडसं उडता येईल
तुला मला लागेल इतका
चिमणचारा मला
नक्कीच आणता येईल
पुन्हा सांगतो दु:ख करू नको
जे तुझं नाही त्याकडे पाहू नको
मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी
हे कधी विसरू नको

दु:खाच्या घरी एकदा

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी

(दीपक)

आयुष्याच्या या वाटेवरती

आयुष्याच्या या वाटेवरती परीस्थितीचे
हे चढऊतार तर येतच राहतील.
सोलवटुन निघालेल्या मनावर मग..
घावाचे व्रण मात्र ऊमटतच् जातील्....

कुणी अश्रु गाळतील्
तर् कुणी निमुटपणे पितील.
कुणी खोटे हसु दाखवतील.
नाहीतर् कुणी बंड करुन ऊठतील....
पण
कितीही कुणी कहीही केले तरी
सावरणारी मन् पुन्हा पुन्हा तुटतील.

तुटणाऱ्या मनातुन् नवीन नवीन् कविता रचतील्....
त्यांना वाचुन् पुन्हा काही मनं सुखावतील्.
आपल्या मनातलं दुखं शब्दात पाहुन
पुन्हा एकदा ती गहीवरुन येतील.

आणि मग एके दिवशी....
सुर सुरांशी जुळुन येतील्
कोमेजलेली मनं पुन्हा एकदा फुलतील...
पावसाच्या सरी कोसळतील्..........
आणि मातीच्या सुंगधात मनामनात प्रेमाचे मोहोर बहरतील.

पण केव्हा हे वसंत ऋउतु येतील?
रखरखलेल्या जमीनीवर मायेचे पाघरुन घालतील.
कुणीतरी विचारा ऋतुराजाला की "केव्हा हे वसंत ऋउतु येतील..?"
निदान मनाला मनाच्या व्यथा तरी कळतील..

................सुषमा कस्तुरे

आयुष्य असचं जगायचं असतं

जे घडेल ते सहन करायचे असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी,
कुठतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं
आयुष्य असचं जगायचं असतं

दु:ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं

मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी,
मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं,
पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं............

एकदा डोळ्यातल्या

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............

काय आयुष्य

काय आयुष्य त्या चिंधीच झाडाला लटकलेल्या,
ना जमिनीवर ना आभाळात, मधल्या मधेच अडकलेल्या.

पण तिचही एक काम आहे,
स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठीचा प्रयत्न आहे.

असच आहे धुलीबाबत, इकडून तिकडे उडते आलेल्या हावेसोबत.
ना ठाव ना ठिकाणा, नवीन बस्तान बसवते नवनवीन धुलीकणासोबत.

पण तरीही प्रत्येक धुलीकणासोबत तितकाच चांगला संसार करते,
भ्रमरासारखे जीवन असून सुद्धा रामासारख वागते.

पक्षांची मात्रा मज्जा असते, फक्त इकडून तिकडे उडायाच,
खायच, प्यायच आणि मास्ता हवेत हिंडत राहायच.

फुलांची तर नोकरी फारच भारी,
सकाळी उठा संध्याकाळी झोपा ही मजाच काही न्यारी.

प्राणी तर त्यांच्याच दुनियेत असतात,
दिवस भर चारतात रवन्थ करतात आणि झोपतात.

अस सगळ्यांचाच चालू असत्, ठरल्या प्रमाणे.
सगळे जण चाकोरीतच जगतात, निसर्गाने ठरवल्या प्रमाणे.

पण माणूस मात्रा वेगळा आहे.
त्याची जगायची रीतच वेगळी आहे.

जन्म एकच पण अनेक जन्म जगायचा प्रयत्न,
ठरवून दिलेले काम एकच, पण सगळीकडे हात पाय मारायचा यत्न.

लहानपणी उंदरसारखा, सगळीकडेच तोंड मारणार.
पौगांडात मंजारी सारखा, लपून दूध पीणार,
तरुणपणी गाढवसारखा, राब राब राबणर.
आणि म्हातारपणी अजगरसारखा, नुसताच पडून राहणार.

का? हा अनेक काम करायचा अट्टाहास का?
ठरवलेल चाकोरीबद्ध जीवन पुरेसा नाही का?
नाही. अस नाही. माणसाला जिद्द आहे काहीतरी करायची,
दिलेला पुरेसा नाही म्हणून नाही, तर मी वेगळा आहे हे सिद्ध करायची.

माणसाला माणूस म्हणताना आपणच चुकतो आहोत,
जन नाही तर प्राण्यांच्याही आपण वर आहोत.
म्हणूनच नुसते जन नाही तर जनांच्याही वर आहोत.

प्रसाद भगवंतराव कुलकर्णी

आयुष्य

आयुष्य सुंदर आहे, त्याला फुलवत रहा.
शुन्यातूनही आयुष्य घडवता येतं. आयुष्य हा एक खेळ
आहे असं समजा आणि तो खेळत रहा. जिद्दी खेळाडू
म्हणून आयुष्याचा खेळ चालू ठेवा. आयुष्याच्या खेळात
मी कोण मोठा नाही, म्हणून रडू नका. खेळात उतरायला
जिद्द लागते ती जिद्द तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही
आयुष्याच्या खेळात उतरता हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या
खेळात डुबून जा, आनंद लुटा, मजा करा पण मधेच फासे
पलटले म्हणून डगमगू नका. आयुष्याचा खेळ चालू ठेवा.
आयुष्याच्या खेळात खिलाडी व्हा. पण आयुष्याच्या खेळात
कधीही प्रेक्षक होऊ नका.

मैत्री म्हणजे एक

मैत्री म्हणजे एक अनोखे बंधन आहे...
मित्रांच्या ह्रदयाचे स्पंदन आहे !

मैत्रीमुळे दुर्गुण पळुन जातात...
मोठमोठे अहंकार गळून जातात !

मैत्रीमुळेच जगण्याला अर्थ आहे ....
मैत्रीशिवाय जगणे व्यर्थ आहे !

मैत्री असते एखाद्या फुलासारखी....
कधीही .. कुठेही .. सुगंध पसरविणारी..!

मैत्री असते एखाद्या लहान मुलासारखी....
गोन्डस.. निरागस.. आनंद देणारी...!

मा़झं सगळं जग मैत्रीत सामावलंय ...
आजवर मी मित्रांचं प्रेम तेव्हढं कमावलंय ..!

मैत्री असते उत्तुंग आकाशाएव्ह्ढी ..
असंख्य सूर्यांच्या प्रकाशाएव्हढी...!

मैत्री मनांतला अंधार घालवते....
असंख्य अडचणींमध्येही आशा पालवते ..!

मैत्री नसलेल्यांचे जीवन रूक्ष आहे....
मैत्री म्हणजे आमच्यासाठी 'सदेह' मोक्ष आहे ..!

आनंद-छंद दायिनि.......... मैत्री..!
स्वच्छंद-धुंद दयिनि.......... मैत्री....!

•♥• मी आहेच असा मैत्री करणारा •♥•

•♥• मी आहेच असा मैत्री करणारा •♥•
•♥• मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा •♥•
•♥• प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा •♥•
•♥• आयुष्यभर घट्ट मैत्रिची •♥•
•♥• साथ निभावनारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा सतत बोलनारा •♥•
•♥• मित्राना नको ते प्रश्न विचारनारा •♥•
•♥• प्रश्न विचारुन त्याना सतवनारा •♥•
•♥• उत्तरे संग म्हणुन •♥•
•♥• तगादा लावणारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा मस्त जगनारा •♥•
•♥• सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा •♥•
•♥• आपल्यातच आपलपन जपनारा •♥•
•♥• पण इतरांच्या आनंदासाठी •♥•
•♥• स्वतालाही विसरनारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा मनासारख जगनारा •♥•
•♥• यशाचे शिखर चदताना हाथ देणारा •♥•
•♥• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा •♥•
•♥• सुखाच्या रस्त्यावरून जाताना •♥•
•♥• आयुष्य सजवनारा... •♥•

मैत्री असते कशी

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की...
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी........!!!!

कमळ पत्रा वरील पाण्याला


कमळ पत्रा वरील पाण्याला
कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्‍या क्षणांना
कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री
आणि जी फक्‍त आपली असते,ती मैत्री.

काही माणसे असतात खास


काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर
तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात...

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

"मैत्री" असा एक

"मैत्री" असा एक
शब्द- त्यात
कधी प्रेमळ तर कधी
तात्विक विषयावरही
आपलं भांडण होतं
अनावश्यक वादही होतो,
एकमेकांच्या मनाला
साद घालण्यासाठी
थेट काळजापर्यंत भिडणारा
असा नादही होतो...
"मैत्री" असा एक शब्द- त्यात
आई,वडील,भाऊ, बहिण
यांची उणीव तशी
क्वचितच भासते,
असं एक नातं
जे बुडत्याला आधार
अन् मर्त्याला मिळालेले
श्वासाचं दान असते...
"मैत्री" असा एक शब्द- त्यात
अनंत काळाच्या
सोबतीचा संकल्प
दोन्ही बाजूने बिनशर्त
असा सोडायचा असतो,
सोबतीने सुरूवात केलेला
ऐन रंगात आलेला
असा एक खेळ
अर्ध्यावरती मोडायचा नसतो....

एकही मित्र नाही

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

दोस्ती करणं सोपं नसतं...

दोस्ती करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण दोस्ती करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन दोस्तित पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग दोस्तिचे स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण दोस्ती करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण दोस्ती करणं सोपं नसतं...

मैत्री केली आहेस म्हणुन

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!

एक तरी मैत्रीण अशी हवी

एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवाज देणारी
आपल्या साठी हसणारी
वेळ आलीयतर अशॄही पुसणारी
स्वताःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या
मित्राची समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताणा मात्र
मुस्काडात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्य़ाच्या घोळकात
आपणांस सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसतांना व्याकूळ होणारी
खरच!अशी एक तरी जीवा भावाची
"मैत्रीण" हवी जी आपणास मित्र म्हणणारी

ओळख

ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची

आगस्टच्या पहील्या रवीवारी..

आगस्टच्या पहील्या रवीवारी..
नेहमीच मैत्रीचा पूर येतो..
जिव्हाळ्याच्या या नात्याला
आनंदाच्या ओघात वाहून नेतो..

प्रेमाच्या मैत्रीच्या सरी..
विश्वासाच्या नभातून कोसळत असतात..
नवचैतन्याच्या शिरशिरीत
दोस्तीच्या गळामिठी घडत असतात..

कुठे शाळेच्या आठवणी तर
कुठे कोलेजचे कट्टे डोळ्यासमोर येतात..
मस्करी,चेष्टा अन खोड्या आठवत..
नियमाच्यापलीकडचे नाते हळूवार जपत असतात...

असले कसले हे नाते मैत्रीचे
जिथं सारं काही विसरून
ऐकमेकांसाठीच जगायला अन मरायल होतं..
एवलूसं हे रोपट मग पारंब्याच वड कस काय होतं?

अश्याच पारंब्या आणखी वाढत राहो..
अज्रामर अश्या या मैत्रिच्या नात्याच वटवृक्ष..
माणूकीच्या अधार नात्याला..
जिवापाड जपत राहो....

मैत्री

आई वडिल, भाऊ-बहिण
यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं
जीवाभावाच्या मैत्रीचं.
झाडाला स्थिरावण्यासाठी
गरज असते मुळांची
समाजात जगण्यासाठी
गरज असते खर्‍या मित्राची.
मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो
विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते.
असंच नातं प्रत्येकानं जपावं
मायभूमीचं नवं रूप साकारावं.
विश्वासाचं ते नातं
गळ्यातलं ताईत बनतं
मात्र केवळ विश्वासघातामुळे
फाशीचा ते दोर बनतं.
आता तुम्हीच ठरवा
काय करायचं?
माणसातल्या माणुसकीला कसं जपायचं.

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा